मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !

मुंबई – राज्यातील अमराठी रिक्शा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, तसेच प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा, यासाठी परिवहन विभागाने धोरणात्मक अन् ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्व अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांना ४ घंट्यांचा ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’ पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. १५ ऑगस्टनंतर प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.