जुळ्या बहिणींसमवेत विवाह केल्याच्या प्रकरणी युवकावर गुन्हा नोंद !

युवकाच्या पहिल्या पत्नीकडून तिसरी पत्नी केल्याची तक्रार

अकलूज (जिल्हा सोलापूर) – अकलूज (माळेवाडी) येथे २ डिसेंबर या दिवशी एका अतुल अवताडे या युवकाने जुळ्या बहिणींसमवेत विवाह केला. राहुल फुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला. अतुलचा याआधीच विवाह झाला असल्याने त्याच्या  पहिल्या पत्नीने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. ‘जुळ्या बहिणींशी केलेला विवाह पहिल्या पत्नीला मान्य नाही’, असे सांगत तिने अतुलच्या विरोधात तक्रार दिली आहे.

अतुल याने कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींशी विवाह केला. त्या दोघीही मुंबई येथील आयटी आस्थापनात अभियंता आहेत. बालपणापासून एकत्र राहिलेल्या दोघी बहिणींना अखेरपर्यंत एकत्र रहायचे होते. त्यासाठी त्यांनी एकाच युवकाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.