ईशान्य भारताला जाणवले भूकंपाचे धक्के !

नवी देहली – ईशान्य भारतात १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियांग येथे होता. याआधी ९ नोव्हेंबरच्या रात्री नेपाळ, तसेच देहलीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. यामुळे नेपाळमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.