जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

श्री. संजय दीक्षित

‘जात मंदिरांमध्ये नाही, तर सरकारी चाकरी, शिष्यवृत्ती, विनामूल्य वस्तूंचे वाटप, शासकीय योजना आणि राज्यघटनेकडून प्राप्त जातीनिहाय आरक्षण यांमध्ये विचारली जाते. ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते. सनातन धर्मामध्ये महर्षि व्यास, महर्षि वाल्मीकि, संत रविदास यांनाही ब्राह्मण आणि संत यांच्या श्रेणीतील स्थान देण्यात आले. सनातन धर्माने कर्माने महान बनण्याचा आणि तसे होण्याचा सिद्धांत दिला.