
नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनवणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्या. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली. २६ ऑगस्ट २०२२ या दिवशी सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले उदय उमेश लळित हे ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा कार्यकाळ अवघ्या ७४ दिवसांचा होता.
जस्टिस धनंजय यशवंत चंद्रचूड़ देश के 50वें मुख्य न्यायाधीश होंगे. चंद्रचूड़ 9 नवंबर को चीफ जस्टिस बनेंगे. उनका कार्यकाल 10 नवंबर 2024 तक होगा-@Sehgal_Nipun की रिपोर्ट #CJIJusticeDyChandrachud #SuprmeCourt #India https://t.co/aoM6spG9CB
— ABP News (@ABPNews) October 11, 2022
सरकारने ७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी पत्र लिहून सरन्यायाधीश लळित यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची विनंती केली. त्यानुसार सरन्यायाधिशांनी सर्व न्यायमूर्तींच्या उपस्थितीत वरील घोषणा केली. सेवाज्येष्ठतेच्या नियमानुसार सरन्यायाधिशांनंतर न्या. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वांत वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. न्या. चंद्रचूड आता ९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. ते १० नोव्हेंबर २०२४ या दिवशी सेवानिवृत्त होतील, म्हणजेच त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा असेल.
वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश होणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील पहिले उदाहरण !
न्या. चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड हे २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या कालावधीत देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. आजपर्यंत सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी राहिलेले ते पहिले आणि एकमेव होते. वडिलांनंतर मुलगा सरन्यायाधीश होणे, हे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे.
IAF Officer Wife Rape : वायूसेनेतील अधिकार्याच्या पत्नीवर बलात्कार; २ धर्मांधांना ५ दिवस पोलीस कोठडी !
Vinod Kashyap Murder : देहराडून (उत्तराखंड) येथे भाजपचे नेते विनोद कश्यप यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ५ मुसलमानांना अटक
Muslims Opposed : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’
(म्हणे) ‘भाजपने पसरवलेल्या विषामुळे देशातील बहुसंख्य समाज विषारी झाला आहे !’ – Samajwadi Party MP Javed Ali
Bhagwant Mann : ‘अकाल तख्त’ने पंजाबचे मुख्यमंत्री मान यांना ठरवले ‘गुरु द्रोही’ !
देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर ड्रोनद्वारे आक्रमणाची शक्यता : सरकारकडून अतीदक्षतेची चेतावणी