मुंबई येथे पत्रकार परिषद

मुंबई – देशात शरीयत कायदा लागू झालेला नाही. ‘जर हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ’, अशी चेतावणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर देशात ठिकठिकाणी अशा प्रकारच्या धमक्या हिंदूंना मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी ही चेतावणी दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नाही. नवाब मलिक अल्पसंख्यांक विकासमंत्री राहिलेले नाहीत.
२. नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याने अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या झाली. भाजप नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही.
३. नगरमधील कर्जत येथेही एका तरुणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. या आक्रमणात गंभीर घायाळ झालेला तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन आम्ही दिले आहे.
४. आमच्या देवतांची विटंबना केली गेली, तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने उत्तर देतो; मात्र एकालाही जिवे मारल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का ? पण तुम्ही तशी पावले उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावे लागेल. हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल. आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !