मुंबई – राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्रे सिद्ध करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ११ सहस्र ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीत तातडीने साहाय्य करता यावे, यासाठी राज्यात पूरप्रवण भागांत राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये खेड येथील जगबुडी नदीने चेतावणीची पातळी गाठली आहे, तर गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी आणि इंद्रावती नद्यांनी धोक्यांची पातळी गाठली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. गडचिरोलीमधील १० सहस्र ६०६ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी न्यून झाली असून चंद्रपूर शहरातील पाणीही ओसरत आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त !
राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त !
नूतन लेख
- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मे या दिवशी !
- पिंपरी (पुणे) येथील ‘बलून पार्क’चे काम रखडले !
- मंत्री राणे आज उमेदवारी अर्ज भरणार
- शवपिशव्या खरेदी घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन संमत !
- पुणे येथे सौ. सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, डॉ. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज प्रविष्ट !
- ऑनलाईन पश्चिम राज्यस्तरीय ‘शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा’ !