अनुमती न घेता सुट्टीवर जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना दंड ठोठवा ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – अनुमती न घेता सुट्टीवर जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना दंड ठोठावावा, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी म्हटले.

१. वर्ष २००० मध्ये खाण मंत्रालयात कार्यरत असलेला एक अधिकारी १०० दिवसांपेक्षा अधिक काळ सुट्टीवर गेला होता. सुट्टीवर जाण्यापूर्वी अनुमती न घेतल्यामुळे त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश कायम ठेवला होता.

२. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हा आदेश रहित करत अधिकार्‍याला निवृत्तीवेतनाच्या लाभांसह सक्तीची निवृत्ती घेण्याचे निर्देश दिले.