राज्यातील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक ४ ऑगस्टला होणार ! – निवडणूक आयोग

निवडणूक

मुंबई – राज्याच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित केली आहे. ५ जुलैपासून आचारसंहिता लागू होणार आहे. ४ ऑगस्ट या दिवशी मतदान होणार असून ५ ऑगस्टला मतमोजणी होईल.

निवडणुका असलेल्या ग्रामपंयचायतींमध्ये निवडणूक क्रायक्रम घोषित केल्यापासून निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे. ‘निवडणुकीच्या काळात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे’, असेही सांगण्यात आले आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल !

  • तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक – ५ जुलै २०२२
  • नामनिर्देशनपत्रे मागवण्याचा आणि सादर करण्याचा दिनांक – १२ ते १९ जुलै
  • नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक – २० जुलै
  • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक – २२ जुलै
  • निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा, तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची सूची प्रसिद्ध करण्याचा दिनांक – २२ जुलै
  • मतदानाचा दिनांक – ४ ऑगस्ट
  • निकाल घोषित करण्याचा दिनांक – ५ ऑगस्ट