
कर्णावती – भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते. या जहाजात हे ७ खलाशी होते. गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली. या जहाजातून भारतात बंदी असलेल्या काही वस्तू आणल्याचा संशय आहे. ‘पुढील अन्वेषणासाठी ते जहाज आणि ७ खलाशी यांना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखा बंदरात आणले जाईल’, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी गुजरातचे आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानातून सागरी मार्गाने आणलेले २८० कोटी रुपये किमतीचे ५६ किलो अमली पदार्थ पकडले होते.
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी