
कर्णावती – भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते. या जहाजात हे ७ खलाशी होते. गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली. या जहाजातून भारतात बंदी असलेल्या काही वस्तू आणल्याचा संशय आहे. ‘पुढील अन्वेषणासाठी ते जहाज आणि ७ खलाशी यांना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखा बंदरात आणले जाईल’, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी गुजरातचे आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानातून सागरी मार्गाने आणलेले २८० कोटी रुपये किमतीचे ५६ किलो अमली पदार्थ पकडले होते.
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !