पाकिस्तानात चालते व्हा !

भारताची धर्माच्या आधारे फाळणी करून एक मोठा भाग मुसलमानांना देण्यात आला; मात्र मोहनदास गांधी यांनी ‘ज्या मुसलमानांना भारतात रहायचे असेल, ते येथेच राहू शकतात’, असे सांगितल्यामुळे मुसलमानांची मोठी लोकसंख्या या देशात राहिली. ती आज या देशाला डोईजड झाली असून भारताच्या मुळावर उठली आहे. जगातील मुसलमानांची सर्वाधिक लोकसंख्या असणारा भारत हा इंडोनेशियानंतर दुसरा देश झाला आहे. पाकिस्तानमधील मुसलमानांची लोकसंख्या त्याहून अल्प आहे, हे लक्षात घ्यायला हवे. वर्ष १९४७ मध्ये फाळणी होतांना १० लाख हिंदूंचे हत्याकांड करण्यात आले होते. त्याच वेळी काश्मीर गिळंकृत करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आणि त्यात नेहरूंच्या राष्ट्रघातकी धोरणामुळे पाकिस्तान मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. आज गेली अनेक दशके आपण काश्मीरच्या प्रश्नामुळे अशांतता अनुभवत आहोत. स्वातंत्र्यापासून आता देशात भाजपचे सरकार येईपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी मुसलमानांचे लांगूलचालन केल्याने त्यांची लोकसंख्या वाढण्यासह देशातील जिहादी आतंकवाद आणि जिहादी कारवायांना ऊत आला. इतके होऊनही त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होत राहिला. या उलट हिंदूंनाच ‘भगवे आतंकवादी’ ठरवण्यापर्यंत या हिंदुद्रोही राजकीय पक्षांची मजल गेली. आता हेच मुसलमान हिंदूंना भारतातून चालते होण्याची धमकी देऊ लागले आहेत आणि यावर देशातील राजकीय पक्ष मौन बाळगून आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फाळणीच्या वेळी स्पष्ट केले होते, ‘धर्माच्या आधारे मुसलमानांना वेगळा देश देण्यात येत असल्याने दोन्हींकडील लोकांची धर्मानुसार अदलाबदली झाली पाहिजे. मुसलमानांनी पाकमध्ये, तर पाकमधील हिंदूंनी भारतात आले पाहिजे’, असे म्हटले होते. एरव्ही मतांसाठी त्यांच्याविषयी प्रेम व्यक्त करणारे राजकीय पक्ष यावर मौन बाळगतात. जर डॉ. आंबेडकर यांचे ऐकले असते, तर आज पाकिस्तानमधील हिंदूंचा वंशसंहार झाला नसता आणि भारताच्या दुसऱ्या फाळणीची सिद्धताही झाली नसती. इतकेच नाही, तर हिंदूंना ‘तुम्ही या देशातील नाहीत’, असे सांगून त्यांनाच या देशातून ‘चालते व्हा’, असे म्हणण्याचे मुसलमानांचे धाडस झाले नसते. उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील देवबंदमध्ये जमीयत उलमा-ए-हिंदचे दोन दिवसांचे अधिवेशन पार पाडले. दुसऱ्या दिवशीच्या मार्गदर्शनात या संघटनेचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी हिंदूंना डिवचतांना म्हटले, ‘आम्ही तुम्हाला घाबरवण्याचा नाही, तर काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही आम्हाला भीती दाखवता. याउलट आम्ही केवळ सांगतो. भीती दाखवणे बंद करा. मुसलमान या देशाचे शत्रू नाहीत, तर नागरिक आहेत. हा देश आमचा आहे. तुम्हीही बाहेरचे आहात. तुम्हाला आमचा धर्म पसंत नसेल, तर खुशाल चालते व्हा.’ मदनी यांच्या या विधानावर तितक्याच परखडपणे उत्तर देणे आवश्यक आहे; मात्र भाजपने थोडेसे प्रत्युत्तर दिले, तरी अन्यत्र शांतता आहे. ही शांतता हिंदूंसाठी धोकादायक आहे. हिंदूंनी वैचारिक विरोध करणे आवश्यक आहे. महंमद अली जिना यांच्यासारख्या मानसिकतेला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. जमीयतचे अधिवेशन उत्तरप्रदेशमध्ये झाले आहे. उत्तरप्रदेशात सध्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे. तरीही जमीयतला अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस झाले, ‘समान नागरी कायद्याला विरोध करू’, ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये हस्तक्षेप सहन करणार नाही’, असे ठराव संमत करण्याचे धाडस झाले, हे लक्षात घ्यायला हवे. काँग्रेसच्या काळात हिंदू दबून रहात होते; मात्र आता राज्यात योगी आदित्यनाथ यांचे, तर केंद्रात मोदी यांचे सरकार असतांनाही मुसलमान दबून रहाण्यापेक्षा हिंदूंनाच धमकी देण्याचे धाडस करू धजावतात. यातून त्यांची सिद्धता किती आहे, हे समजून घेतले पाहिजे.

सोक्षमोक्ष लावा !

जमीयत ही मुसलमानांची देशातील सर्वांत मोठी संघटना आहे, असा दावा तिच्याकडून केला जातो. १०० वर्षे जुन्या असलेल्या या संघटनेने मुले आणि मुली यांच्या सहशिक्षणाला नेहमीच विरोध करून तालिबानी मानसिकता दाखवून दिली आहे. गेल्या वर्षी लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायदाच्या दोघा आतंकवाद्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांचा खटला लढवण्याची घोषणा याच संघटनेने केली होती. हिंदूंच्या होणाऱ्या धर्मसंसदेवरही या संघटनेने टीका केलेली आहे. एकूणच या संघटनेची मानसिकता कट्टरतावादी आहे. भारताच्या फाळणीच्या वेळी या संघटनेचीही फाळणी होऊन एक गट पाकिस्तानमध्ये गेला. या संघटनेने देशासाठी काही केल्याचे ऐकिवात नाही. हीच नव्हे, तर मुसलमानांच्या कोणत्याही संघटना भारतासाठी, भारतीय जनतेसाठी कधी काही करतांना दिसत नाहीत. जेव्हा देशावर पूर, दुष्काळ, आतंकवादी आक्रमणे आदी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटे येतात, तेव्हा या संघटना रस्त्यावर उतरून लोकांना साहाय्य करतांना कधीच दिसत नाहीत. याविषयी देशातील एकही निधर्मीवादी कधी बोलत नाही; मात्र देशाच्या साधनसंपत्तीचा लाभ घेण्यात हेच लोक पुढे असतात. सार्वजनिक रुग्णालयांचा लाभ घेण्यामध्ये यांचीच संख्या अधिक दिसून येते. मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करून त्यांच्या मशिदी केल्या, हा इतिहास असतांनाही हे मुसलमान हिंदूंना त्यांची मंदिरे परत करण्यास जीव तोडून विरोध करत आहेत. ही मानसिकता हिंदुद्वेषीच आहे. त्यामुळे आता या सर्वांवरही देशभरात चर्चा झाली पाहिजे. फाळणीनंतर मुसलमानांना या देशात ठेवल्यानंतर देशाला काय लाभ झाला आणि किती तोटा झाला, याचा हिशोब आता मांडलाच पाहिजे. हिंदूंनाच या देशातून ‘चालते व्हा’ म्हणण्याचे धाडस करणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी आणि हिंदुत्वनिष्ठ सरकारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. असे केल्याने हिंदूंनाच ‘तालिबानी’ म्हटले जाणार आणि खऱ्या तालिबानी विचारांच्या लोकांना कुरवाळले जाणार, हेही तितकेच खरे ! तरीही हिंदूंनी आता याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वैध मार्गाने कृतीला प्रारंभ केला पाहिजे !

हिंदूंनो, तुम्हालाच या देशातून ‘चालते व्हा’ म्हणणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या !