(भाग १४)

१. घराला आश्रम बनवण्यासाठी काय करावे ?
साधकांनो, आपल्या घरात देवत्व निर्माण करण्यासाठी घराला आश्रमासारखे चैतन्यमय बनवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे आपत्काळातही तुमच्या वास्तूवर देवाच्या कृपेचे कवच राहील. ते अस्तित्वात राहील, तुमचे रक्षण करील आणि ते साधनेसाठी पोषकही होईल. त्यामुळे ‘आपले घर हे गुरूंचा आश्रम किंवा आपल्या आराध्यदेवाचे मंदिर आहे’, अशा भावाने तेथे रहावे. ‘त्यांची दृष्टी सतत आपल्यावर आहे’, असा भाव ठेवावा. आश्रमाप्रमाणेच घरातही वर्तन करावे. गुरूंना अपेक्षित असल्याप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करावा.
२. गुरूंप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी ?
हा संस्कार मनात बिंबवण्यासाठी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी की, त्यांनी आम्हाला आपल्या आश्रमरूपी घरात रहाण्याची सुवर्णसंधी दिली आहे. ‘हा आमच्या श्रीगुरूंचाच आश्रम आहे. मी केवळ त्यांचा सेवक आहे’, असा भाव ठेवावा.
(क्रमश:)
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !