
‘अध्यात्मात सेवकभावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हनुमानाने युगानुयुगे दास्यभक्तीचा सर्वाेत्कृष्ट आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. तो आपल्या प्रभूकरता (श्रीरामाकरता) प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असायचा. श्रीरामाच्या सेवेपुढे त्याला सर्वकाही कवडीमोल वाटायचे.
सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !
साधकहो, प्रभु श्रीरामचंद्रांच्या रामराज्य स्थापनेच्या कार्याशी पूर्णतः एकरूप झालेल्या हनुमंताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात स्वतःला समर्पित करा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२२)
साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !