Cyber ​​Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !


मुंबई, २३ जुलै (वार्ता.) – सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वर्ष २०१६ मध्ये महाराष्ट्र सायबर कार्यालय स्थापन करण्यात आले. हेच कार्यालय आता ‘राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार आहे. तसा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

केंद्रशासनाने वर्ष २०१८ मध्ये भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन केले. या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक राज्यात त्या राज्याचे सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन करण्याचे निर्देश जून २०२६ मध्ये दिले आहेत. त्यानुसार वरील निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला.