मंदिरांतून हिंदूंना आपल्या धर्माची तत्त्वे आणि मूलभूत ज्ञान दिले गेले पाहिजे ! – परमात्माजी महाराज, श्रीक्षेत्र द्वारापूर, धारवाड येथील श्री परमात्मा महासंस्थानमचे श्रीगुरु

परमात्माजी महाराज

प्रतिदिन भारतात २ सहस्र ५०० ते ३ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते. हे थांबवण्यासाठी कायदा आणायला हवा. हिंदु धर्मावरील हा आघात रोखण्यासाठी हिंदु बांधवांनी पुढे येऊन सरकारवर यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. सध्या दूरचित्रवाहिनीवरील (टीव्हीवरील) विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माची अवहेलना केली जाते. हिंदूंनी याविषयी सतर्क असले पाहिजे. हिंदूंना मंदिरांतून आपल्या धर्माची तत्त्वे आणि मूलभूत ज्ञान दिले पाहिजे.