(म्हणे) ‘हिंदूंच्या धर्मगुरूंनी त्यांना मुसलमानांच्या नरसंहारासाठी भडकावले !’

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवरील आक्रमणावरून असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप !

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे करण्यात आली असतांना हिंदूंनाच गुन्हेगार ठरवण्याच्या ओवैसी यांच्या प्रयत्नावर कुणीही विश्‍वास ठेवणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – देशातील काही ठिकाणी मुसलमानांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण करण्यासाठी श्रीरामनवमीच्या मिरवणुका अणि रथयात्रा यांचा वापर करण्यात आला. हिंदूंच्या धर्मगुरूंनी मुसलमानांचा नरसंहार आणि त्यांच्यावर अत्याचार करण्याचे आवाहन केले.

त्यामुळे पोलिसांच्या पाठिंब्याने हिंदुत्वाची भाषा करणार्‍या जमावाने राजस्थान, गुजरात, झारखंड आणि मध्यप्रदेश येथील वातावरण बिघडवले, असा फुकाचा आरोप एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे) अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील काही राज्यात श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांकडून झालेल्या आक्रमणाविषयी केला.