उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर

‘लव्ह जिहाद’ची आणखी एक घटना उजेडात !

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा कायदा असूनही उद्दाम धर्मांध हे हिंदु मुलींची फसवणूक करतच आहेत. यावरून त्यांच्यात धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

लखनौ (लक्ष्मणपुरी) – उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील एका हिंदु मुलीचे धर्मांधाने अपहरण करून तिला बांदा जिल्ह्यातील मशिदीमध्ये नेले. तेथे त्या मुलीचे मौलवीने बलपूर्वक धर्मांतर केले आणि नंतर संबंधित धर्माध तरुणाचा तिच्याशी विवाह लावून दिला. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलीची सुटका केली आणि आरोपी साबिर मिर्झा याला अटक केली.

पीडित मुलगी ३१ मार्च २०२२ या दिवशी परीक्षेला बसण्यासाठी घरून निघाली होती. ती घरी न परतल्याने तिच्या वडिलांनी गाझीपूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. आपल्या मुलीला आमीष दाखवून पळवून नेल्याची शक्यता त्यांनी तक्रारीमध्ये व्यक्त केली होती. या प्रकरणी मौलवीचीही चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेच्या ३ दिवसांआधी फतेहपूर जिल्ह्यातील लालोली पोलीस ठाण्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले होते.