जितेंद्र आव्हाड यांना मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी नव्हे, तर मशीद आणि भोंगा यांविषयी पुळका ! – मनसे

डावीकडून जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना दंगलीत मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांविषयी नव्हे, तर मशीद किंवा भोंगा याविषयी बोलल्यावर पुळका येतो, अशी टीका मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यावर आव्हाड यांनी टीका केल्यावर जाधव यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.

जाधव यांनी म्हटले, ‘‘ठाण्यात वर्ष २००७-२००८ ला राबोडी आणि दुसरी भिवंडी या शहरांमध्ये दोन मोठ्या दंगली झाल्या होत्या. यात आपल्या दोन पोलिसांना प्राण गमावावे लागले होते. त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल ? याविषयी आव्हाड यांना कधी कळवळा आला नाही; मशीद, भोंगा याविषयी बोलल्यावर पुळका येतो.’’