हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडा ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

मुंबई – सध्या चर्चेत असलेल्या ‘हिजाब’ प्रकरणामागे आतंकवादाची पार्श्वभूमी असलेल्या विविध देशद्रोही धर्मांध संघटना, पक्ष आणि साम्यवादी आहेत. ‘पहले हिजाब-फिर किताब’, अशी भित्तीपत्रके महाराष्ट्रात काही धर्मांध पक्ष आणि संघटना यांनी लावली आहेत. यातून त्यांना पहिले इस्लाम, मग शिक्षण हवे आहे, हे स्पष्ट होत आहे. ‘हिजाब’चे निमित्त करून सर्वत्र ‘इस्लामीकरण’ करण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे. आज शाळेतील मुसलमान मुलींना पुढे करून धर्मांध संघटना प्रथम मुलींना ‘हिजाब’, मग ‘बुरखा’ घालून येण्यास सांगतील. नंतर त्या संघटना शाळांमध्ये नमाजपठण आणि त्यासाठी मशिदीचीही मागणी करतील. शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने ९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आयोजित केलेल्या ‘शाळांमध्ये हिजाबचा आग्रह का ?’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात तेऑन बोलत होते.

श्री. प्रमोद मुतालिक

या विशेष संवादामध्ये  कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि उद्योजक श्री. प्रशांत संबरगी, देहली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या विनीता राघव आणि हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनीही सहभाग घेतला.

जगभरातील अनेक इस्लामी देशांत हिजाब, बुरखा यांवर बंदी असतांना भारतात त्याची मागणी का केली जाते ? – प्रशांत संबरगी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, कर्नाटक

श्री. प्रशांत संबरगी

हिजाबचा विषय केवळ कर्नाटकपुरता मर्यादित नाही, तर हे पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. ‘शेतकर्‍यांचे कथित आंदोलन’, ‘पुरस्कार वापसी’ याप्रमाणे सध्याच्या ‘हिजाब’च्या विषयावर ट्विटरवर लाखो ट्वीटस् करून त्यात पाकचे पंतप्रधान इम्रान खान, नोबेल पुरस्कार विजेती मलाला, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांच्यासह गणवेश आणि समानता याचा अर्थ न कळलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा यांनी सहभागी होणे, यातून हा ‘आंतरराष्ट्रीय अजेंडा (कार्यसूची)’ आहे, हे स्पष्ट होते. जगभरातील अनेक इस्लामी देशांत शाळा, महाविद्यालये, सरकारी संस्था येथे हिजाब, बुरखा यांवर बंदी आहे; मात्र भारतात हिजाबची मागणी का होत आहे ?


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “स्कूलों में ‘हिजाब’ का आग्रह क्यों ?”

______________________

भारताचे इस्लामीकरण करण्याचा डाव उधळला पाहिजे ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोहन गौडा

कर्नाटकमध्ये शाळेचा गणवेश परिधान न करता मुसलमान मुलींनी हिजाबमध्ये येण्यास प्रारंभ केल्यावर हिंदु मुलींनी त्याला वैध मार्गाने विरोध केला. त्यानंतर हिंदु मुलींवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या. काही हिंदु संघटना सोडल्या, तर राजकीय पक्षांसह सर्वांनीच या घटनेविषयी मौन बाळगले. अशा घटनांतून उघडकीस येणारा भारताचे इस्लामीकरण करण्याचा डाव उधळला पाहिजे.

अधिवक्त्या विनीता राघव

देहली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या विनीता राघव म्हणाल्या की, हिजाबचा विषय आता न्यायालयात गेला आहे. तरीसुद्धा न्यायालयाच्या निर्णयाची वाट न बघता धर्मांध लोक आंदोलन करत आहेत. यातून न्यायालयासह सर्वांवर दबाब आणण्याचा प्रयत्न आहे.