राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ९.१.२०२२

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.


(म्हणे) ‘मंदिरे ही सरकारची संपत्ती आहे !’

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याला काँग्रेसचा विरोध !

  • चर्च आणि मशिदी सरकारची संपत्ती नाही का ? केवळ हिंदूंच्या मंदिरांना ‘सरकारची संपत्ती’ म्हणणारे मोगलांचे वंशज होत ! अशा काँग्रेसवाल्यांना निवडणुकीत धडा शिकवा ! – संपादक
  • ‘मंदिरांची संपत्ती राजकोषात जमा केल्यास राजकोषाचा नाश होतो’, असे हिंदु धर्मशास्त्रात म्हटले आहे. काँग्रेसने देशावर आणि अनेक राज्यांत सर्वाधिक काळ राज्य केल्याने भारतावर अब्जावधी रुपयांचे कर्ज झालेले आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • भ्रष्टाचारी राजकारणी स्वतःची संपत्ती प्रतिदिन वाढवत असतात आणि मंदिरांची संपत्ती सरकारजमा करून त्याची लूट करतात ! – संपादक
कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार

‘कर्नाटकच्या भाजप सरकारने राज्यातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने याचा विरोध केला आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी म्हटले आहे, ‘‘सरकार एक ऐतिहासिक चूक करत आहे. (मंदिरांचे सरकारीकरण करणे, हीच सर्वपक्षियांनी केलेली ऐतिहासिक चूक आहे. ती चूक राज्यातील भाजप सरकार सुधारत असेल, तर ते योग्य आहे ! – संपादक) काँग्रेस अशी चूक होऊ देणार नाही. धर्मादाय विभाग किंवा सरकार हे स्थानिक लोकांना मंदिरे प्रशासनासाठी कशी देऊ शकतात ? ही सरकारची संपत्ती आहे. या मंदिरांनी सरकारी तिजोरीत कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. (हे कोट्यवधी रुपये हिंदु भाविकांनी देवतेला अर्पण केलेले आहेत, सरकारला नाही, हे प्रत्येक राजकीय पक्षाने आणि नेत्यांनी कायमचे लक्षात ठेवावे ! हा पैसा हिंदु धर्मासाठीच खर्च केला गेला पाहिजे ! सरकारने जनतेकडून घेतलेल्या करातून विकासकामे केली पाहिजेत. त्यासाठी मंदिराच्या पैशांवर त्यांनी लक्ष ठेवू नये ! – संपादक) इतर राज्यांकडे बघून ते (भाजप सरकार) कोणती राजकीय भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहेत ? यावर आम्ही सर्व वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक घेत आहोत. त्यामध्ये आम्ही चर्चा करू आणि आमची भूमिका मांडू.’’ (काँग्रेसवाल्यांनी या बैठकीत चर्च आणि मशिदी यांच्या संपत्तीविषयी चर्चा करून हिंदूंना सांगावे ! – संपादक)


येत्या १५ ते २० वर्षांत जिहाद्यांच्या गृहयुद्धाद्वारे भारताची पुन्हा फाळणी होण्याचा धोका ! – जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

जितेंद्र नारायण सिंह त्यागी

‘मदरसे बंद करण्याचे सूत्र मी उपस्थित केले आहे. त्याकडे दुर्लक्ष केले, तर पुढील १५ ते २० वर्षांत जिहादी हे भारतात गृहयुद्ध करतील आणि भारताची पुन्हा फाळणी करून त्यांना एक तुकडा द्यावा लागेल’, असे विधान श्री. जितेंद्र सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी इंग्रजी दैनिक ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘आज मदरशांमध्ये इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेचे विचार शिकवले जात आहेत आणि मुसलमान मुलांमध्ये जिहाद पसरवला जात आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.

श्री. जितेंद्र त्यागी यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे

मदरशांमध्ये मुलांवर जिहादचा संस्कार केला जातो !

मदरशांमध्ये लहान मुलांमध्ये जिहादी विचारांचा संस्कार रुजवला जातो. त्यामुळे ते कट्टर होतात. त्यातूनच ते वेळ पडल्यास बंदूकही हातात घेतात. मदरशांमधून दिलेल्या शिक्षणातून हिंसाचार होतो. मदरशांमध्ये जे काही मुलांना शिकवले जाते, त्यामुळेच हिंसाचार आणि जिहादी कारवाया होत आहेत.

मंदिरे तोडून मशिदी बांधलेल्या अन्य जागाही हिंदु पुन्हा मागतील, यासाठी धर्मांध बाबरीसाठी लढत होते !

जरी श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणाचा निकाल मुसलमानांच्या बाजूने लागला असता, तरी ते तेथे रामललाची स्थापित केलेली मूर्ती हटवू शकले नसते; कारण त्यामुळे हिंसाचार झाला असता. ‘बाबरीच्या ढाच्यावरील अधिकार सोडला, तर ज्या ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या मिळण्यासाठी हिंदू मागणी करतील’, याची धर्मांधांना भीती होती. त्यामुळेच ते बाबरी ढाच्यावरील अधिकार सोडू इच्छित नव्हते.’


जिहादी कारवाया रोखण्यासाठी फ्रान्समध्ये आतापर्यंत २२ मशिदी बंद !

देशातील २ सहस्र ६०० पेक्षा अधिक मशिदींपैकी १०० मशिदींची चौकशी करण्याचा आदेश

भारताच्या तुलनेत छोटासा असणारा फ्रान्स जे करू शकतो, ते भारत का करू शकत नाही ? – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

‘फ्रान्स सरकारने पॅरिसच्या उत्तरेला अनुमाने १०० किलोमीटर अंतरावर ५० सहस्र लोकसंख्या असलेल्या बोवई शहरातील एका मशिदीला बंद करण्याचा आदेश दिला आहे. फ्रान्स सरकारने आतापर्यंत बंद केलेल्या मशिदींपैकी ही २२ वी मशीद आहे. देशातील २ सहस्र ६०० पेक्षा अधिक मशिदींपैकी १०० मशिदींची चौकशी करण्याचा आदेशही सरकारने दिला आहे मशीद बंद करण्याच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, इमामने जिहादला एक ‘कर्तव्य’ म्हटले आणि जिहाद्यांना इस्लामचे ‘हिरो’ (नायक) म्हणून दाखवले. तसेच इमामने मुसलमानेतरांना शत्रू ठरवले.’


महाराष्ट्र्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन यांचा खळबळजनक गौप्यस्फोट !

  • ‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचण्यासाठी काँग्रेसचा दबाव !

  • मालेगाव बाँबस्फोटात पकडलेले पाकिस्तानी आणि स्थानिक मुसलमान यांना पुरावे असूनही सोडण्यास भाग पाडले !

एकीकडे ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍या आणि दुसरीकडे ‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनी जाब विचारणे आवश्यक ! – संपादक

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन

‘वर्ष २००८ च्या मालेगाव बाँबस्फोटात २ पाकिस्तानी आणि ८ स्थानिक मुसलमान यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध सर्व पुरावेही होते; मात्र तत्कालीन सरकारने दबाव आणून त्यांना सोडण्याचा आदेश दिला. या वेळी हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांसह अन्य हिंदूंना बलपूर्वक पकडण्यात आले’, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. वर्ष २००८ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार होते अन् काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते.’


‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी केलेले अत्याचार यांच्या या आठवड्यात झालेल्या घटना

  • धर्मांधाने हिंदु मुलीला फसवून नेपाळला नेले आणि तिचे धर्मांतर करून केले लग्न !
  • महंमद शाकिरने ‘शिवम्’ बनून हिंदु युवतीला फसवले आणि अश्लील चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी देत केला अनेक वेळा बलात्कार !
  • आग्रा (उत्तरप्रदेश) येथील अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्‍या धर्मांधाला हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतर अटक !
  • शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विवाहित आसिफकडून हिंदु मुलीची गळा आवळून हत्या !
  • हिंदु मुलींना मुसलमान मुलांशी बोलण्यासाठी दबाव टाकणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक !
  • गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे विवाहित धर्मांधाचा अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार !
  • रियाझने नग्न छायाचित्रांच्या माध्यमातून हिंदु युवतीला केले ‘ब्लॅकमेल’ – धर्मांधाचा हिंदु युवतीवर बलात्कार आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर !
  • अल्पवयीन दलित मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी महंमद मेजरला अटक !
  • दरभंगा (बिहार) जिल्ह्यात धर्मांधांनी केले २ हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर !