शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला दु:ख होईल, असे कोणतेही काम माझ्या हातून होणार नाही ! – आमदार रामदास कदम, शिवसेना

मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील समस्त जनतेला मी सांगू इच्छितो की, ‘माझ्यानंतर उद्धवला साथ द्या’, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शेवटचे शब्द होते. शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला दु:ख होईल, असे कोणतेही काम माझ्या हातून होणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार रामदास कदम यांनी केले. रामदास कदम यांच्या आमदारपदाचा कार्यकाळ जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्यासह कार्यकाळ पूर्ण होणार्‍या ८ जणांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्या वेळी बोलतांना कदम यांनी वरील भावना व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर टीका केली होती. कदम पक्षांतर करणार असल्याची वृत्ते माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. या सर्व वृत्तांना रामदास कदम यांनी पूर्णविराम दिला.