जीवनाची लढाई जिंकण्यासाठी सिद्ध रहा !

हातावर हात ठेवून नशिबावर अवलंबून राहू नका. उठा आणि स्वतःचे नशीब स्वतः बनवा. तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही. जीवनात १-२ वेळेस अपयश आले, म्हणून काय झाले ? त्यापासून शिकवण घ्या आणि संघर्ष करा. रात्र कितीही मोठी असली, तरी ती सूर्याला नेहमीसाठी लपवू शकत नाही. आपल्या मनातील कटू भावना काढून फेका आणि पुन्हा नव्या जोमाने पूर्ण ताकदीनिशी जीवनाची लढाई जिंकण्यासाठी सिद्ध रहा.

(साभार : साप्ताहिक ‘जय हनुमान’, २१.४.२०१८)