
नवी देहली – कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या कालावधीत, म्हणजेच एप्रिल आणि मे मासांमध्ये प्रतिदिन होत असलेल्या चाचण्यांमध्ये घट होऊन आता निम्म्याच चाचण्या होत आहेत. एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी १८ लाख, तर मे मासामध्ये प्रतिदिन १९ लाख ५० सहस्र चाचण्या केल्या गेल्या; मात्र ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एकाही दिवशी चाचण्यांची संख्या ११ लाखांपर्यंत पोचली नाही. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ (कोरोनाच्या चाचणीचा प्रकार) चाचण्यांची टक्केवारी देशात अल्प होत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ ७० टक्के, तर जलद चाचण्या ३० टक्के होत होत्या; परंतु २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत सरकारी आकडेवारीनुसार एकूण चाचण्यांमधील ‘आर्.टी.पी.सी.आर्.’चा वाटा ६२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !