लोकांना श्वास घेणेही झाले कठीण !
|

नवी देहली – राजधानी देहलीमध्ये ४ नोव्हेंबरला रात्री दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात प्रचंड वाढ होऊन लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. दिवाळीत प्रदूषणकारी फटाके फोडण्यावर बंदी घातली होती; मात्र तरीही देहलीत अनेक ठिकाणी प्रदूषण करणारे फटाके फोडण्यात आले. त्यामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावून ती वाईट श्रेणींमध्ये आली आहे. येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५ नोव्हेंबरला सकाळी फटाक्यांच्या धुरामुळे धुक्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. समोर २०० मीटर अंतरावरील भागही अंधूक दिसत होता.
Smog shrouds Delhi after Diwali fireworks; farm fires peak at 36% https://t.co/PZ6cLsiZGl
— TOI Cities (@TOICitiesNews) November 5, 2021
१. देहलीतील जनपथ भागातील ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ (ए.क्यू.आय.) ‘धोकादायक श्रेणीत’ पोचला. संपूर्ण देहलीचा ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ ४४६ सह ‘गंभीर श्रेणीत’ पोचला. त्याचवेळी नोएडा आणि गाझियाबाद येतील परिस्थितीही अत्यंत बिकट होती. शहरातील अनेक लोकांनी त्यांचा घसा खवखवण्याची आणि डोळ्यांत पाणी येण्याची तक्रार केली.
२. केंद्र सरकारच्या अनुमानानुसार ७ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणार नाही.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’