परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात संतांनी समाधी घेण्याच्या संदर्भात आलेले विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘९.१०.२०२१ या दिवशी माझ्या मनात समाधी संदर्भातील पुढील विचार आला. संतांनी समाधी घेतल्यावर काही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘संतांनी आत्महत्या केली’, असे वाटते. आज माझ्या लक्षात आले की, जेव्हा संतांना ‘या भूतलावर आता अधिक करण्यासारखे किंवा मिळवण्यासारखे काही उरलेले नाही’, याची जाणीव होऊ लागते, तेव्हा त्यांना या जगातून पुढील लोकांत जाण्याची ओढ लागते. त्यामुळे ते समाधी घेतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (९.१०.२०२१)