तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याने होऊ शकणार्‍या धर्मयुद्धात भारताचा विजय निश्चित ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

अमेरिकेसारख्या ‘सुपर पॉवर’ला (महासत्तेला) हरवले, हे तालिबानच्या डोक्यात आहे आणि हेच तिसर्‍या महायुद्धाचे कारण होऊ शकते. त्यातून निर्णायक धर्मयुद्ध होईल. त्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा वापर करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा द्यावा लागणार आहे. सहस्रो वर्षांच्या जिहादी आणि धर्मांध आक्रमणांनंतर आजही भारत स्वतंत्र आहे. युद्ध हे भारतियांच्या रक्तामध्ये आणि अनुवांशिकतेमध्ये आहे. भूमीवरचे युद्ध लढण्याची क्षमता प्रत्येक भारतियामध्ये आहे. धर्माच्या निर्णायक युद्धात धर्माचा, म्हणजेच भारताचा विजय निश्चित आहे.