किरीट सोमय्या यांच्यावर गृहमंत्रालयाकडून कारवाई; मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत

मुंबई – केंद्र सरकारच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि अपर्कीत करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून चालू आहे. अशा प्रकारचे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे. किरीट सोमय्या यांच्यावर १९ सप्टेंबर या दिवशी केलेली कारवाई ही गृहमंत्रालयाने केली असून यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा काही संबंध नाही, असा खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २० सप्टेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.