पोलीस अधिकार्यांनी नुसती अशी माहिती देऊन काय उपयोग ? एवढी वर्षे एक आतंकवादी दाऊदशी संबंध ठेऊन मुंबईत रहात आहे, तर तेव्हाच कारवाई का केली नाही ? ‘आमचे त्याच्यावर लक्ष होते’ या म्हणण्याला काय अर्थ आहे ? आतंकवाद्याने घातपात करण्याची आतंकवादविरोधी पथक वाट पहात होते का ? – संपादक

मुंबई – ‘देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकतीच ६ आतंकवाद्यांना अटक केली आहे. यामधील एक आतंकवादी हा मुंबई येथील धारावीमधील रहिवासी आहे. जान महंमद अली महंमद शेख असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानातील ‘डी कंपनीशी’ (आतंकवादी दाऊदची टोळी) त्याचे संबंध आहेत, असे अनेक पुरावे आहेत. असे जवळपास २० वर्षांपूर्वीचे पुरावे आहेत. आमचे त्याच्यावर लक्ष होते; मात्र आमच्याकडे आतंकवाद्यांच्या कारस्थानाची माहिती नव्हती. ती केंद्रीय यंत्रणांकडे होती. त्यांच्याकडून ती माहिती देहली पोलिसांना देण्यात आली होती’, अशी माहिती राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाचे (‘ए.टी.एस्.’चे) अतिरिक्त महासंचालक विनीत अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. देहली पोलिसांनी ६ आतंकवाद्यांना अटक केल्यानंतर विरोधकांकडून ‘आतंकवादी मुंबईत असतांना ‘ए.टी.एस्.’ झोपली होती का ?’ असा उपस्थित केला होता. त्यानंतर ‘ए.टी.एस्.’ने पत्रकार परिषद घेत वरील माहिती दिली. मुंबईमध्ये ‘रेकी’ झालेली नाही, असे अग्रवाल यांनी सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !