मुंबई – ऑगस्टच्या पहिल्या सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला प्रारंभ होणार आहे. आठवड्यातील ४ दिवस न्यायालयाचे काम चालू असणार आहे. यामध्ये ३ दिवस प्रत्यक्ष, तर १ दिवस ‘ऑनलाईन’ कामकाज चालेल. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा अधिक धोका असलेल्या पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि नगर या ११ जिल्ह्यांमधील कनिष्ठ न्यायालये अर्धा दिवस कार्यरत रहातील, असे निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये न्यायालयाचे काम पूर्ण दिवस होणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी चालू होणार !
ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी चालू होणार !
नूतन लेख
- अमरावती, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यांतील काही ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक बिघाड; मतदार ताटकळले !
- ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून भांडी धुण्यासाठी अत्याधुनिक यंत्र स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट !
- नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप खैरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा अर्ज घेतला !
- नंदुरबार येथे लाचखोर प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्याविरुद्ध जमाव संतप्त !
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाचे थकवले ४० कोटी रुपये !
- नगरमध्ये २७ ते २९ एप्रिल या कालावधीत गीतेवर प्रवचनमालिका !