
पुणे – मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही मान्य आहे, तर अडले कुठे ? आरक्षणाच्या मुद्यावरून तरुणांची माथी भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केला. न्यायालयात व्यवस्थित बाजू का मांडली जात नाही ? असेही त्यांनी विचारले. तसेच सर्वांना व्यासपिठावर आणून चर्चा केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौर्यावर असून त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?; राज ठाकरेंचा सवालhttps://t.co/I1Hv8w6trR#mns | #rajthackeray | #bjp | #mahavikasaghadi | #obcreservation | #marathareservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 11, 2021
राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ? याचाही समाजाने विचार करायला हवा. या वेळी त्यांनी महापालिका निवडणुकीविषयी मनसेची भूमिका काय असणार ? असे विचारले असता परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे उत्तर त्यांनी दिले आहे.
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !