भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’, अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी’, ‘संघी’ असे म्हटले जाते. ‘आंध्रप्रदेशमधील २४ सहस्र ६३२ हिंदु मंदिरे सरकारने कह्यात घेतली’, असे मी मानतो. या सर्व मंदिरांची ४ लाख एकर भूमी शासकीय अधिपत्याखाली आहे. यात १ लाख एकर भूमीवर अतिक्रमण झाले आहे. हिंदूंकडून त्यांची मंदिरे, त्यांची भूमी आणि त्यांचे स्रोत काढून घेण्यात आले अन् हिंदू कमकुवत झाले. यामुळे मंदिरांविषयी हिंदूंची श्रद्धा आणि जवळीकता न्यून झाली. वास्तविक धर्मनिरपेक्ष सरकारला हिंदूंची मंदिरे बळकावण्याचा कोणताही अधिकार नाही. जर सरकारला हिंदूंची मंदिरे हवी असतील, तर हे राष्ट्र हिंदु राष्ट्र करावे आणि मग शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी. राज्यघटनेनुसार सरकार आणि शासकीय संस्था यांनी एकसंध राहून कोणताही भेद न करता कार्य करायला हवे; मात्र सरकार एका विशिष्ट धर्माकडे झुकलेले दिसते. हे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण नाही.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय
हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय
नूतन लेख
- Free Hindu Temples Peethadhipati Mantralaya : सरकारने मठ आणि मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करावीत ! – ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री
- रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय
- Durga Puja Threat Bangladesh : दुर्गापूजा करायची असेल, तर ५ लाख टका (अनुमाने साडेतीन लाख रुपये) द्या !
- Bangladesh Durga Puja Idol Vandalized : बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड !
- Sadguru Jaggi Vasudev : हिंदूंची मंदिरे आता भक्तांनीच चालवायला हवीत ! – सद़्गुरु जग्गी वासुदेव
- छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदु राष्ट्राची शपथ घेतली होती ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज