उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !

प्रातिनिधीक इमेज

‘न्यायमूर्ती एम्.बी. शहा समितीने गोव्यात ३५ सहस्र कोटी रुपयांचा खाण घोटाळा झाल्याचे म्हटले होते. या समितीच्या अहवालाच्या आधारे गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने साळगावकर खाण उद्योग आणि अन्य ६ आरोपी यांच्या विरोधात वर्ष २०१३ मध्ये गुन्हा नोंद केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने साळगावकर खाण उद्योगासह एकूण ७ जणांच्या विरोधातील गुन्हा रहित केला आहे. अन्वेषणात अवाजवी विलंब, चौकशीत कोणतीही ठोस प्रगती न होणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन करून गुन्हा नोंदवण्यात आल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.’ (दैनिक सनातन प्रभात, २०.७.२०२६)