बलात्कार आणि हत्या यांच्या प्रकरणातील अटकेतील धर्मांधाचे पोलिसांवर आक्रमण करून पळण्याचा प्रयत्न

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धर्मांध घायाळ

बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले, तर अशा घटना होणार नाहीत !

 

कोकराझार (आसाम) – येथे काही दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन आदिवासी बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला टांगण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी मुजम्मिल शेख, नजीबुल शेख, फारूक रहमान आणि अन्य चौघांना अटक केली होती. यांपैकी फारूक रहमान याला घटनास्थळी चौकशीसाठी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याचा भ्रमणभाष असल्याचा दावा त्याने केला होता. घटनास्थळी नेल्यावर ज्या ठिकाणी भ्रमणभाष असल्याचा दावा केला होता, तेथे एक धारदार शस्त्र होते आणि ते त्याने घेऊन उपस्थित पोलिसांवर आक्रमण केले अन् पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात तो घायाळ झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.