
मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा अभाव असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ३० जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पोलीस दलातील २ लाख २५ सहस्र ४६१ संमत पदांपैकी २३ सहस्र ३२० पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील आहेत. ‘असोसिएशन ऑफ सोशल अँड आरटीआय ॲक्टिव्हिस्ट्स’ संस्थेचे अध्यक्ष संजय थुल यांनी माहिती अधिकारातून याविषयीची माहिती मागवली होती. महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक सतीश जाधव यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली.
पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक संवर्गातील (श्रेणीतील) ४५४ संमत पदांपैकी ४२४ पदे भरलेली असून ३० पदे रिक्त आहेत, तसेच पोलीस उपअधीक्षक संवर्गातील ९७२ संमत पदांपैकी ७८७ पदे कार्यरत असून १८५ पदे रिक्त आहेत.
संजय थुल यांनी ‘राज्यातील वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता २३ सहस्रांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरावीत’, अशी मागणी केली आहे. ‘संयुक्त राष्ट्रांच्या निकषांनुसार प्रति १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलिसांचे प्रमाण गाठण्यासाठी संमत केलेली पदसंख्या वाढवावी’, यासाठी शासनाला निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (असे निवेदन का द्यावे लागते ? सरकार यादृष्टीने अभ्यास आणि पदे भरतीसाठी प्रयत्न का करत नाही ? – संपादक)
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !