परभणी येथील लेंडी नदीला पूर आल्याने ५ गावांचा संपर्क तुटला !

परभणी – १३ जूनच्या रात्री मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर आल्याने परिसरातील आरखेड, फळा, सोमेश्‍वर, घोडा, उमरथडी या ५ गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून पाणी जात असल्याने गावकर्‍यांची ये-जा बंद झाली. नदीवर अल्प उंचीचा पूल असल्याने प्रतिवर्षी ही समस्या उद्भवते. वारंवार मागणी करूनही पुलाचे काम न केल्याने स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. (लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे लक्ष का देत नाही ? – संपादक)