सातारा – विविध शालेय उपक्रमांमध्ये संपूर्ण राज्यात झालेल्या गुणांकनामध्ये सातारा जिल्ह्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, प्रथम क्रमांक मुंबई जिल्ह्याचा असून तो शहरी भाग आहे. ग्रामीण महाराष्ट्राचा विचार केल्यास सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळा सिद्धी, शालेय पोषण आहार, माध्यान्ह आहार, दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयीसुविधा, यू-डायस, डायट, एस्.सी.ई.आर्.टी. अशा विविध उपक्रमांना राज्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला गुणांकन देण्यात आले, तसेच शाळेची सुरक्षितता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल उपक्रम आदी गोष्टींनाही गुणांकन देण्यात आले आहे. हे गुणांकन ६०० गुणांचे होते. सातारा जिल्ह्याला ६०० पैकी ४२७.८१ गुणांकन प्राप्त झाले आहे.

जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे