लाचखोरांवर आतापर्यंत कठोर कारवाई झाली असती, तर कोरोनाच्या संकटकाळात त्यांना पकडण्यासाठी व्यय होणारा वेळ आणि मनुष्यबळ वाचवता आला असता !

पुणे, १७ मे – राज्याच्या लाचलुचपत विभागाने ११ मे पर्यंत राज्यात २७७ सापळे रचून ३७६ आरोपींना पकडले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
संभाजीनगर विभागात सर्वाधिक ८२ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यानंतर नाशिक विभागात ६७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे विभागात ६३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यावर पुणे लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे म्हणाले, ‘‘विभागाकडे आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते. यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे अल्प तक्रारी आल्या असू शकतात. तक्रारदाराच्या तक्रारीवरून कारवाई केल्यानंतर कायदेशीर काम पूर्ण करून देण्यासाठी पाठपुरावा केला जातो.’’
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
११ म्युल बँक खात्यांवर गुन्हे नोंद
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !