श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जय हिंद फूड बँक यांच्या सहकार्याने गरजू लोकांसाठी अन्नदान सेवा !

निराधार अन् गरजू लोकांना एक वेळचे जेवण

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यशासनाने दळणवळण बंदी लागू केली आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना न्यासाकडून अन्नदान सेवा चालू करण्यात आली आहे. येथील ‘जय हिंद फूड बँक’ यांच्या सहकार्याने अक्कलकोट शहर आणि परिसरातील निराधार अन् गरजू लोकांना एक वेळचे जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचा प्रारंभ १८ एप्रिल या दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्याम मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाटगे, जय हिंद फूड बँकेचे अंकुश चौगुले, तसेच शहाजी यादव, अशोक जाधव, योगेश पवार, अतिश पवार, महांतेश स्वामी यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.