मधुबनी (बिहार) येथील मंदिरांतील दोघा साधूंची शिरच्छेद करून हत्या !

लव्ह जिहादला विरोध करणार्‍या महंतांच्या आश्रमावरही आक्रमण

बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे द्योतक. भारतभर साधू-संतांच्या हत्या होत असतांना त्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !

धरोहर नाथ मंदिराजवळ तपास करतांना पोलिस

मधुबनी (बिहार) – येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. रात्री झोपेत असतांना त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. घटना उघडकीस आल्यावर येथे मोठ्या संख्येने गावकरी गोळा झाले होते. हत्येमध्ये ४-५ जणांचा समावेश असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर या साधूंचे धड लाकडाच्या भूशात लपवण्यात आले होते, तर त्यांचे शीर अन्यत्र ठेवण्यात आले होते.

बिसौली कुटी आश्रमावरही आक्रमण

उजवीकडे बिसौली कुटीचे महंत ब्रजमोहन दास

या घटनेच्या आदल्या रात्री येथून जवळच असलेल्या बिसौली कुटीचे महंत ब्रजमोहन दास यांच्या आश्रमावरही आक्रमण करण्यात आले होते. महंत ब्रजमोहन दास या भागातील लव्ह जिहाद आणि धर्मांधांच्या विरोधात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.