कोरोनामुळे १५ ते १७ एप्रिल या कालावधीत कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कनिष्ठ न्यायालये, औद्योगिक न्यायालये, उच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करणारे लवाद इत्यादींचे कामकाज १५ ते १७ एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ न्यायालयाचे कामकाज या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. या ३ दिवसांची भरपाई म्हणून १९ जून, तसेच ३ आणि १७ जुलै या दिवशी न्यायालयाचे कामकाज होणार आहे.