
नगर, १२ एप्रिल – अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. प्रतिदिन कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग, होणारे मृत्यू आणि पुरोहितांची सुरक्षितता यांचा विचार करून नगरमध्ये होणारे सर्व दशक्रिया विधी ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित संघटनेने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान हे कोरोनाबाधित असल्याची माहिती लपवत आहेत. गर्दीतच विधी करण्यासाठी पुरोहितांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
९० वर्षीय वृद्ध सासूला स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत सूनबाई पूर्ण करत आहे ८४ कोस प्रदक्षिणा !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक