
नगर, १२ एप्रिल – अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. प्रतिदिन कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग, होणारे मृत्यू आणि पुरोहितांची सुरक्षितता यांचा विचार करून नगरमध्ये होणारे सर्व दशक्रिया विधी ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित संघटनेने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान हे कोरोनाबाधित असल्याची माहिती लपवत आहेत. गर्दीतच विधी करण्यासाठी पुरोहितांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू