
‘पूर्वीच्या काळातील लोक निसर्गाच्या साहाय्याने अनेक गोष्टींचा अभ्यास करून ‘पुढे काय होणार ?’, हे सांगत होते. पूर्वीच्या काळी आपले ऋषिमुनी सर्व काही निसर्गात पहात होते आणि त्याला प्रार्थनाही करत होते. ‘प्रकृतीला कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये’, यासाठी काळजी घेऊन ते निसर्गाची पूजाही करत होते. ते सर्वजण निसर्गाशी एकरूप होते. पक्ष्यांचा किलबिलाट, झाडांचे सळसळणे, प्राण्यांचे दिसणे आणि ढग यांच्याकडे पाहून त्यांना निसर्गात शुभ अन् अशुभ होणार्या गोष्टींचे संकेत मिळत होते. त्यात ते निपुणही होते. विज्ञानाच्या अतिरेकीपणामुळे आजच्या युवा पिढीला निसर्गापासून पुष्कळ दूर नेले आहे. आजच्या युवा पिढीला काही पहायचे असेल, तर ते ‘गूगल’ या प्रणालीवर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना ‘निसर्गात देवत्व न दिसता केवळ मनोरंजन दिसते’, हे आपले दुर्भाग्य आहे.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू (२.१२.२०२०)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !