‘हे जगा, तू भौतिक शोध कितीही लावलेस आणि घरबसल्या दूरदूरचे ऐकलेस अन् पाहिलेस, स्वल्प (अल्प) काळात दूरची मजल गाठलीस, यंत्राच्या साहाय्याने अल्पावधीत विपुल ऐहिक सुखाची साधने तू कितीही अपार (अधिक) निर्माण केलीस, आकाशात उडालास आणि तेथे यथेच्छ फिरलास, तरी तुला नितांत शांतीचा क्षण लाभणे दुर्लभ ! शाश्वत सुखाचा लाभ होणे दुरापास्त ! अचल समाधान लाभणे अगदीच अशक्य ! हे निर्भेळ (निर्विवाद) सत्य आहे. उलट तुझ्या राक्षसी कृत्यांना त्यामुळे ऊत येत राहील. कामक्रोधादि विकार बेफाम वाढतील आणि आपल्या अल्पस्वार्थासाठी देशच्या देश उद्ध्वस्त करण्याची स्व-परधातुक (स्पर्धातुक) प्रवृत्ती वणव्यासारखी तुझ्या अंतःकरणात सदैव पेटत राहिल. ‘खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये नित्य तृप्तीने नांदवील.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी, (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, वैशाख शके १९०८, मे १८८५)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात