‘हे जगा, तू भौतिक शोध कितीही लावलेस आणि घरबसल्या दूरदूरचे ऐकलेस अन् पाहिलेस, स्वल्प (अल्प) काळात दूरची मजल गाठलीस, यंत्राच्या साहाय्याने अल्पावधीत विपुल ऐहिक सुखाची साधने तू कितीही अपार (अधिक) निर्माण केलीस, आकाशात उडालास आणि तेथे यथेच्छ फिरलास, तरी तुला नितांत शांतीचा क्षण लाभणे दुर्लभ ! शाश्वत सुखाचा लाभ होणे दुरापास्त ! अचल समाधान लाभणे अगदीच अशक्य ! हे निर्भेळ (निर्विवाद) सत्य आहे. उलट तुझ्या राक्षसी कृत्यांना त्यामुळे ऊत येत राहील. कामक्रोधादि विकार बेफाम वाढतील आणि आपल्या अल्पस्वार्थासाठी देशच्या देश उद्ध्वस्त करण्याची स्व-परधातुक (स्पर्धातुक) प्रवृत्ती वणव्यासारखी तुझ्या अंतःकरणात सदैव पेटत राहिल. ‘खरे सुख हवे असल्यास तू वैदिक सिद्धांताकडे बघ. तो तुला शाश्वत सुखाचा लाभ करून देऊन, तुझा जीवनकलह पार मावळून टाकून केवळ सुखाच्या साम्राज्यामध्ये नित्य तृप्तीने नांदवील.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी, (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, वैशाख शके १९०८, मे १८८५)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
देवाची आवड असणार्या आणि मुलीला सेवा करायला प्रोत्साहन देणार्या आगवे (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमती गजानन नाखरे (वय ८२ वर्षे) !
धर्मशास्त्र काय सांगते ?