
जीवनातील शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक यांसारख्या ८० टक्के समस्यांमागील मूळ कारण ‘आध्यात्मिक’ असते. म्हणजेच समस्येमागील कारण वरकरणी स्थूल किंवा भौतिक वाटत असले, तरी त्यामागे प्रारब्ध, पूर्वजांचा त्रास, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी अदृश्य स्वरूपातील आध्यात्मिक कारणे असतात. या कारणांवर मात करून जीवनाचे अंतिम ध्येय, म्हणजे आनंद मिळवायचा उपाय एकच व तो म्हणजे ‘साधना’.
‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी दररोज करावयाचे प्रयत्न. ईश्वराचे पृथ्वीवरील चालते बोलते रूप म्हणजे गुरु. गुरूंच्या कृपेशिवाय साधना करून ईश्वरप्राप्ती करणे खूप कठीण असते. याउलट गुरुकृपेच्या माध्यमातूनच ईश्वरप्राप्ती होणे खूप सोपे व शक्य असते. गुरुकृपा लवकर होण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’.
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !