श्रीहरि स्मरणाने दुःखे दूर होतात

‘जसे सूर्योदय होताच रात्र पळून जाते, सिंहाची गर्जना ऐकताच हत्तीला भीती वाटते, तसेच हरिभक्त समोर येताच संकटे पळून जातात. त्यांच्या दृष्टीच्या समोर येतच नाहीत. जसे महालक्ष्मी येताच दरिद्री माणसाचे दारिद्र्य दूर होते, तसेच (सर्वव्यापक, सर्वांचे अंतरात्मा) श्रीहरीचे स्मरण केल्याने जन्म-मरणरूपी दुःख दूर होते.’

– संत श्री निळोबा महाराज

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२०)