रस्त्यावरील फलकावर असे लिहिणारा जगातील एकमेव देश आहे भारत !

‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर अशुद्ध मराठी भाषेत लिखाण केले आहे. या फलकांवर मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुका आहेत. महामार्गाच्या दर्जाविषयी स्थानिक जनता, तसेच लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. तरीही आता ठेकेदार आस्थापनाकडून फलक सिद्ध करतांना चुका झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार आस्थापन यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.’