मध्यप्रदेशातील भाजप सरकारच्या मंत्री उषा ठाकूर यांचा दावा

इंदूर (मध्यप्रदेश) – पंजाब आणि हरियाणा राज्यांतील उच्च दर्जाचे दलाल नियोजित पद्धतीने शेतकरी आंदोलन चालवत आहेत. साम्यवादी विचारसरणीचे लोक आणि ‘टुकडे – टुकडे गँग’ यामध्ये सहभागी झाली असून शेतकर्यांच्या परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा मध्यप्रदेशच्या पर्यटन, संस्कृती आणि अध्यात्म खात्याच्या मंत्री उषा ठाकूर यांनी केला आहे. ‘या प्रयत्नामध्ये ते कधीही यशस्वी होणार नाहीत. रचलेला खोटा कट फार काळ झाकून रहाणार नाही’, असेही ठाकूर यांनी म्हटले.
उषा ठाकूर यांनी सांगितले की, कृषी कायद्यातील भ्रम दूर करण्यासाठी भाजप जनजागृती मोहीम राबवत आहे. यासाठी एक मोठे नियोजन करण्यात आले आहे. भाजपचे मोठे नेते शेतकर्यांना कायद्याची माहिती आणि त्याचे लाभ सांगतील. (भाजपने हे आधीच का केले नाही ?, असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार