मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्याकडे मांडले लेखी गार्हाणे
सरपंचांचेही गावगुंडांना भय नसणे, हे चिंताजनक आणि दुर्दैवी !

सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) – जावळी तालुक्यातील शिंदेवाडी येथील धनश्री शिंदे यांनी संरपंचपदाची धुरा संभाळून ३ वर्षे झाली. या कालावधीत त्यांनी गावामध्ये समाधानकारक विकासकामे केली आहेत; मात्र काही गावगुंडांनी सरपंच हे पद गावाच्या सेवेसाठी कायमस्वरूपी आपल्यालाच मिळाले पाहिजे, असा हेका धरला आहे. त्यामुळे धनश्री शिंदे यांच्या प्रत्येक उपक्रमात चुका काढणे, तक्रारी करणे, येता-जाता टोमणे मारणे असे उद्योग या गावगुंडांनी चालवले आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून शेवटी सरपंच धनश्री शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंत्री यांच्याकडे गार्हाणे मांडले आहे.
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !