हिंदु असल्याचे सांगून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांधाकडून तिच्याशी विवाह

खरी ओळख उघड झाल्यावर तरुणीला मारहाण

‘युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व क्षम्य असते’, असा प्रचार केला जातो; मात्र धर्मांधांकडून करण्यात येणारे कृत्य हे प्रेम नसून ‘लव्ह जिहाद’ असल्याने अशांना कठोर शिक्षाच झाली पाहिजे !

(प्रतिकात्मक चित्र)

नवी देहली – येथील रोहिणी क्षेत्रातील प्रेमनगरमध्ये रहाणार्‍या धर्मांधाने स्वतःचे नाव पालटून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्य समाज मंदिरात जाऊन विवाह केला. काही दिवसांनी त्याची खरी ओळख उघड झाल्यावर तरुणीने ती घरी जात असल्याचे सांगिल्यावर तिला मारहाण करण्यात आली.

या तरुणीने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यात धर्मांध तरुणाचे वडील आणि त्याचे २ भाऊ यांचा समावेश आहे. धर्मांध तरुण पसार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.