
बेळगाव – दळणवळण बंदीच्या काळात येथील खानापूर तालुक्यात मार्च २०२० ते मे २०२० पर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तरीही या काळात पेंडल व्यवस्था, पोलीस बॅरिकेट्स, जेवण, ‘सॅनिटायझर’, ‘मास्क’ आणि इतर कामे यांसाठी ७५ लाख रुपये व्यय दाखवण्यात आला आहे. एवढा व्यय करून कोणतेही काम करण्यात आले नाही. त्या कामासाठी कोणतीही निविदा संमत करण्यात आली नाही. खानापूर तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी कोरोनाच्या नावाखाली पैशांचा अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दोडमनी यांनी केला आहे. खोटी कागदपत्रे आणि देयके सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांना सर्व माहिती ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळाली आहे. या प्रकरणी त्यांनी एसीबीकडे तक्रार प्रविष्ट केली असून यासंदर्भात पुढील तपास करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. (संदर्भ : belgavkar.com)
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या